शिवसेनेची वाटचाल म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद, नेतृत्वाची दूरदृष्टी आणि जनतेच्या विश्वासाचे बळ. १९६६ पासून अनेक ऐतिहासिक टप्पे शिवसेनेने पार केले आहेत आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही वाटचाल अधिक गतिमान झाली आहे.
“शिवगौरव शेतकरी योजना” मुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने बी-बियाण्यांचा पुरवठा झाला. यामुळे उत्पादनात 35% वाढ झाली.
“शासनाने वेळेत मदत केली नसती, तर माझं शेत सोडावं लागलं असतं.”
– सुनील पाटील, शेतकरी
“लाडकी बहिण” योजनेमुळे एका विधवा महिलेला स्वतःचा किराणा व्यवसाय सुरू करता आला.
“या पैशातून मी मुलीला शिकवते आणि दुकान चालवते. आता कोणापुढे हात पसरावा लागत नाही.”
– कविता ताई साखरे
“बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना” अंतर्गत २000 हून अधिक रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळाली.
“आमच्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाले, हे शिवसेनेमुळे शक्य झाले.”
– भावना कदम, मुलगी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील १७ जिल्ह्यांमध्ये व्यापार आणि पर्यटन वाढले.
“आता आमच्या गावातही इन्व्हेस्टर्स येत आहेत. विकास आता खऱ्या अर्थाने आमच्या दारी.”
– ग्रामसेवक, शेवगाव
ही प्रत्येक यशोगाथा म्हणजे बाळासाहेबांची दूरदृष्टी, आनंद दिघे साहेबांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि एकनाथ शिंदे साहेबांचे लोकाभिमुख नेतृत्व यांचे फलित आहे.